पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे आवाहन
नदीपात्रात पाणी सोडल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पंढरपूर प्रतिनिधी,

उजनी व वीर धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असल्याने उजनी व वीर धरणातून भीमा नदी पात्रात पाणी मोठ्या प्रमाणात सोडल्याने जुना दगडी पूल पाण्याखाली गेला असून इस्कॉन टेम्पल परिसरातील काही भाग पाण्याखाली गेला आहे. बॅरिगेट लावून वाहतूक बंद करण्यात आली आहे.

नदीकाठच्या गावातील नागरिकांना बंधाऱ्यावरून पाणी वाहत असताना वाहतूक करणार नाही होडी चालवणार नाही. कपडे धुणार नाही याबाबत पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत.तसेच बंधाऱ्यावर योग्य पोलीस बंदोबस्त नेमला आहे.अशी माहिती टि. वाय. मुजावर पोलीस निरीक्षक पंढरपूर तालुका पोलीस ठाणे यांनी दिली.

More Stories
आ.अभिजीत पाटलांनी विठ्ठलाच्या पादुका डोक्यावर घेत विठ्ठल संरक्षण दिन केला साजरा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरण गाळपाचा शुभारंभ
माजी आमदार कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण