नगरपरिषद पंढरपूर आषाढी यात्रा 2025 यात्रेकरूंना व भाविकांना नम्र आवाहन-मुख्याधिकारी महेश रोकडे
आषाढी यात्रेसाठी पंढरपूर नगरपरिषदेची यंत्रणा सज्ज
पंढरपूर प्रतिनिधी,

अवघ्या महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असलेल्या श्री.क्षेत्र पंढरपूर येथे दि.६/७/२०२५ रोजी आषाढी यात्रा भरत असुन येणा-या लाखो भाविक वारक-यांना चांगल्या सेवा सुविधा पुरविण्याकामी मा.जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद साहेब, नगरपरिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर नगरपरिषदेची यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली आहे.

शहरामध्ये नगर परिषदेच्या वतीने आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विविध कामे हाती घेण्यात आली असून पालकमंत्री जयकुमार गोरे व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार विविध कामे करण्यात आली आहेत.

पंढरपूर शहरा मध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणा-या लाखो भाविकांना मंदिर परिसर महाद्वार घाट व प्रदक्षिणा मार्गावर दिंडी घेऊन दर्शनासाठी जात असताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून नगर परिषदेने इंदिरा गांधी चौक ते अर्बन बँक नाथ चौक, स्वा.सावरकर पुतळा स्टेशन रोड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक संपूर्ण प्रदिक्षणा मार्ग, महाद्वार, अंबाबाई पटांगण, चंद्रभागा वाळवंट व शहरातील इतर रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यासाठी विशेष मोहिम हाती घेऊन पोलीस प्रशासनाच्या मदतीने अतिक्रमण काढण्यात आली आहेत.

तसेच शहरामध्ये येणारी वाहने मुख्य रस्त्यावर किंवा प्रदक्षिणा मार्गावर येवुन भाविकांना चालताना अडथळा अथवा त्रास होवु नये म्हणुन सर्व ठिकाणी लोखंडी बॅरिकेटिंग करण्यात आलेले आहे.यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर शहरामध्ये भाविकांच्या मोठ्या प्रमाणात येणा-या वाहनांची सोय व्हावी म्हणुन १३ ठिकाणी मोफत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून त्या ठिकाणी नव्याने मोठे मोफत पार्किंगची फलक लावण्यात आले आहेत. तसेच येणाऱ्या भाविकांना शहरातील सर्व ठिकाणांची माहिती व्हावी म्हणून मुख्य चौकात व इतर ठिकाणी ही दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत.कर्मवीर भाऊराव पाटील चौक ठाकरे चौक, 65 एकर, भाई राऊळ पुतळा, शहरातील डिव्हायडर व रस्त्याच्या कडेने लाईट माळा लावण्यात आले आहे व मुख्य चौकाचेही सुशोभिकरण करण्यात आले आहे तसेच 65 एकर भक्ती सागर येथे शंभर फुटी समतेची पताका बसवण्यात आली आहे.

वाळवंटात येणा-या यात्रेकरुंना चालण्यासाठी व पाण्याचे टँकर, जेटिंग मशीन, आरोग्य विभागाची वाहने जाणे-येणेसाठी जुना पुल ते पुंडलिक मंदीरापर्यंत रस्त्याची आखणी करण्यात आली आहे. तसेच पुंडलिक मंदीर ते दगडी पुलापर्यंत 9 हायमास्ट दिवे, प्रत्येक घाटासमोर असलेल्या लोखंडी पोलवर 200 वॅट एलईडी दिवे लावण्यात आले असुन यात्रा कालावधीत कायमस्वरूपी लखुबाई मंदिर घाट, उद्धव घाट, कुंभार घाट व चंद्रभागा घाट चार ठिकाणी स्टेडियम वर असणारे फ्लड लाईट चे मोठे दिवे बसविण्यात आले आहेत सदर दिव्यांचा प्रकाश संपुर्ण वाळवंटात पडत आहे.

त्याचप्रमाणे यात्रेकरुंच्या सोईसाठी संपुर्ण दर्शन बारी मार्ग, ६५ एकर मध्ये १६० एलईडी दिवे व ६ हायमास्ट बसविण्यात आले आहेत. तसेच ६५ एकर भक्ती सागर मध्ये असलेल्या १२ युनिटमध्ये असलेल्या १८०० शौचालयामध्ये विजेची व्यवस्था करण्यात आलेली आहे.दररोजच्या दररोज नदीपात्र स्वच्छ राहण्याच्या दृष्टीने सफाई २०० कर्मचा-यांच नियुक्ती करण्यात आलेली आहे. नदी पात्र, पत्राशेड दर्शनबारी, ६५ एकर, मंदिर परिसरात व शहरात आगीची दुर्घटना होवु नये म्हणुन महत्वाच्या ठिकाणी २४ तास अग्निशमन वाहने उभी करण्यात आली आहेत. पत्रा शेड, नविन अग्निशमन केंद्र, चंद्रभागा नदी वाळवंट तसेच मंदीरा भोवती आग लागल्यास अग्निशमन वाहनास त्वरीत पाणी उपलब्ध व्हावे म्हणुन मंदीराच्या दक्षिण बाजुस फायर हायड्रेट उभा केला आहे.

भाविकांसाठी यात्रा कालावधीमध्ये मंदीर परिसरात दोन वेळा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.गोपाळपुर रोड, दर्शन बारी पत्रा शेडमध्ये पिण्याचे पाणी नळ कनेक्शन द्वारे उपलब्ध करुन दिले आहे. या ठिकाणी आतील बाजुस शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात एकुण ६५ हातपंप व मंदिर परिसरातील १२ विद्युत पंपाद्वारे यात्रेकरुंना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच यात्रा कालावधीत पिण्याचे पाणी किमान १५० टँकर द्वारे संपुर्ण शहरात विशेषतः भक्ती सागर वाळवंट पालखी तळ पत्राशेड ज्या ठिकाणी मठांची संख्या जास्त आहे त्याठिकाणी पाणी पुरविण्यात येणार आहे.शहरात स्वच्छता रहावी म्हणुन नियोजन बद्ध कार्यक्रम आखण्यात आला असून नगरपरिषदेच्यावतीने १५०० सफाई कर्मचा-यांद्वारे शहरात व उपनगरात स्वच्छता करण्यात येत आहे.यात्रा कालावधीमध्ये शहर, वाळवंट, ६५ एकर, पत्रा शेड दर्शनबारी येथे दररोजच्या दररोज स्वच्छता करण्यात येणार आहे. नागरी हिवताप विभागामार्फत शहरामध्ये डेंगु अथवा इतर आजाराचा प्रादुर्भाव होवु नये म्हणुन विशेष मोहिम हाती घेतली असुन कंटेनर सर्व्हे, औषध फवारणी व फॉगिंग मशीन द्वारे धुर फवारणी करण्यात येत आहे.

बायोकल्चर तंत्राचा वापर करुन जैविक पद्धतीने नदीच्या पात्रात शहरात होणारी घाण दुर्गंधीयुक्त वास कचरा व घाण कुजविण्याच्या दृष्टीने फवारणी करण्यात येत आहे.शौचालय नियोजनामध्ये तिर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत व सुलभ शौचालयाची २९ ठिकाणीं २०५४ सीट्स, नगरपरिषदेची कायमची २५ ठिकाणी १७६ सीट्स, ६५ एकर परिसरातील कायम स्वरुपी १२ ठिकाणी १८६४ सीट्स, प्री फॅब्रिकेटेड (नदी वाळवंट, ६५ एकर, पत्राशेड दर्शनबारी, शहरात विविध ठिकाणी) असे एकुण ७० ठिकाणी १९००सीट्स असे शौचालयाचे नियोजन करण्यात आले आहे.शहरात यात्रा कालावधीमध्ये पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने, उपजिल्हा रुग्णालय व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने पत्राशेड दर्शनबारी , पोलीस संकुल, दर्शन मंडप, ६५ एकर , चंद्रभागा वाळवंटात वेदांत भक्त निवास, नागरी आरोग्य केंद्र काळा मारुती व सारडा भवन, श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात यात्रेकरुंच्या सोईसाठी प्रथमोपचार केंद्र उघडण्यात आले आहेत.यात्रा व्यवस्थित पार पडावी म्हणुन उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली, मुख्याधिकारी महेश रोकडे, उपमुख्याधिकारी रवींद्र सूर्यवंशी, नगरअभियंता प्रकाश केसकर,

सुमित पाटील,आरोग्य अधिकारी शरद वाघमारे आरोग्य निरीक्षक नागनाथ तोडकर, नाना गोरे, पाणीपुरवठा अभियंता राजकुमार काळे, नगर रचनाकार सुहास झिंगे, विराज पवार, ऋषिकेश गड्डम, कर अधिकारी सुप्रिया शिंदे, अंजली काबुगडे,जनसंपर्क अधिकारी सुवर्णा हाके, लेखापाल करुणा शेळके, अंतर्गत लेखापरीक्षक प्रशांत पवार, खरेदी पर्यवेक्षक विजय शहाणे, रोडलाईट इन्स्पेक्टर संतोष क्षिरसागर, अग्निशमन अधिकारी संभाजी कार्ले, हिवताप अधिकारी शुभांगी अधटराव, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्नशील आहेत. तसेच यात्रा कालावधीमध्ये शहरातील सर्व स्थानिक नागरीकांनी स्वच्छता व आरोग्य सुव्यवस्थीत राहण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.
More Stories
5 वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे
रस्त्यावर खुलेआम खाद्यपदार्थांची विक्री; अन्न व भेसळ प्रशासनाचे दुर्लक्ष